पोस्ट्स

गलबला रं गलबला

इमेज
गलबला रं गलबला, कस्सला गलबला, शंभूबाळ जन्मला रं, शंभूबाळ जन्मला, वरच्या आळीला, कस्सला गलबला, शंभूबाळ जन्मला रं, शंभूबाळ जन्मला, शेजारच्या शेजारला, निरोप धाडीला, मोहिमेची न्याहरी माझ्या शिवबा राजाला, गलबला रं गलबला, कस्सला गलबला, शंभूबाळ जन्मला रं, शंभूबाळ जन्मला, शेजारच्या शिंप्याला, निरोप धाडीला, मोहिमेचा शेला माझ्या शिवबा राजाला, गलबला रं गलबला, कस्सला गलबला, शंभूबाळ जन्मला रं, शंभूबाळ जन्मला, शेजारच्या लोहाराला, निरोप धाडीला, मोहिमेचा भाला माझ्या शिवबा राजाला, गलबला रं गलबला, कस्सला गलबला, शंभूबाळ जन्मला रं, शंभूबाळ जन्मला, शेजारच्या माळ्याला, निरोप धाडीला, फुलांचे हार माझ्या गडाच्या दाराला, गलबला रं गलबला, कस्सला गलबला, शंभूबाळ जन्मला रं, शंभूबाळ जन्मला,       ⛳⛳⛳⛳⛳⛳⛳

शिवरायांचे नाव घेता....

शरयु नदीला पूर येता पाणी आलं गळ्याला l शरयु नदीला पूर येता पाणी आलं गळ्याला llधृll शिवरायांचे नाव घेता अफझल्या पळाला l पळाला पळाला कोथळा टाकून पळाला l शिवरायांचे नाव घेता अफझल्या पळाला ll1ll शरयु नदीला पूर येता पाणी आलं गळ्याला l शिवरायांचे नाव घेता शाहिस्त्या पळाला l पळाला पळाला बोटे टाकून पळालाl शिवरायांचे नाव घेता शाहिस्त्या पळाला ll2ll शरयु नदीला पूर येता पाणी आलं गळ्याला l संभाजींचे नाव घेता औरंग्या पळाला l पळाला पळाला टोप्या टाकून पळाला l संभाजींचे नाव घेता औरंग्या पळाला ll3ll शरयु नदीला पूर येता पाणी आलं गळ्याला l ताराराणींचे नाव घेता औरंग्या पळाला l पळाला पळाला स्वप्ने तोडून पळाला l ताराराणींचे नाव घेता औरंग्या पळाला ll4ll शरयु नदीला पूर येता पाणी आलं गळ्याला l तानाजींचे नाव घेता उदयभान पळाला l पळाला पळाला तलवार टाकून पळाला l तानाजींचे नाव घेता उदयभान पळाला ll5ll शरयु नदीला पूर येता पाणी आलं गळ्याला l मुरारबाजींचे नाव घेता दिलेरखान पळाला l पळाला पळाला वेडा सोडून पळाला l मुरारबाजींचे नाव घेता दिलेरखान पळाला ll6ll llपुण्यश्लोक छत्रपती श्री.शिवाजी

सुवर्ण सिंहासन का?

इमेज
सुवर्ण सिंहासन का? सभासद बखरीमध्ये शिवछत्रपतींच्या  राज्याभिषेकाचे जे वर्णन केले आहे ते अत्यंत महत्वपूर्ण आहे. त्याचा मागोवा घेतल्याशिवाय सुवर्ण सिंहासनाचा अन्वयार्थ कळू शकत नाही. सभासद लिहितो... पुढे वेदमूर्ती राजेश्री गागाभट्ट म्हणून वाराणशीहून राजियाची कीर्ती ऐकून दर्शनास आले...त्यांस राजे व सरकारकून सामोरे जाऊन, भेट घेऊन सन्मानें आणिलें...गागाभट ्ट बहुत संतुष्ट जाहले. भट गोसावी यांचे मतें, मुसलमान बादशहा तक्ती बसून, छत्र धरून, पातशाही करितात...आणि शिवाजीराजे यांनीही चार पातशाही दबविल्या आणि पाऊण लाख घोडा, लष्कर, गडकोट असे मिळविले असतां त्यांस तक्त नाहीं... याकरितां मऱ्हाठा राजा छत्रपती व्हावा असें चित्तांत आणिलें आणि तें राजियासही मानिलें... पुढें तक्तारूढ व्हावे म्हणून तक्त सुवर्णाचे, बत्तीस मणाचे सिद्ध करविलें. नवरत्ने अमोलिक जितकी कोशांत होती त्यामध्ये शोध करून मोठी मोलाची रत्ने तक्तास जडाव केलीं...जडीत सिंहासन सिद्ध केले...सिंहासना स अष्ट खांब जडीत केले...अष्ट खांबी अष्टप्रधान उभे केले...पूर्वी कृतयुगी, त्रेतायुगी, द्वापारीं, कलयुगाचे ठायीं पुण्यश्लोक राजे सिंहासनीं बैस

गुरुजींविषयी थोडे काही !

'संभाजीराव भिडे गुरूजी' हे व्यक्तिमत्वच विलक्षण प्रभावी ! खरंतर पोषाख, अंगकाठी यांवरून हा पूर्वी कोणी फिजिक्सचा प्राध्यापक वगैरे असावा यावर कोणाचा विश्वासच बसणार नाही. पुणे विद्यापिठातून एम. एस्सी. फिजिक्सचं सुवर्णपदक पटकावणारा हा माणूस खरंतर एखादा नामांकित वैज्ञानिक व्हायला पाहिजे होता. पण 'संघाचिया संगे' बिघडलेला हा माणूस नंतर कुठच्या कुठे पोचला. अत्यंत तल्लख स्मरणशक्ती, स्तीमित करणारी बुद्धीमत्ता, एखाद्या दगडाच्या अंगावरही रोमांच उभे करायला लावणारे वक्तृत्व आणि बारा महिने- चोवीस तास - तीन्ही त्रिकाळ सतत भ्रमण करणारे पाय - हा माणूस ज्याच्या ज्याच्या संपर्कात आला त्या प्रत्येकाचा तो गुरूच झाला- भिडे गुरुजी. पुढे संभाजीराव संघाचे सांगली जिल्हाप्रमुख झाले. तिथे संघाच्या रोपट्याचा त्यांनी डेरेदार वृक्ष केला. प्रत्येक तालुक्याच्या गावागावात शाखा सुरू झाल्या.बघताबघता संभाजीराव सांगली जिल्ह्याचे गुरुजी झाले. आता सांगली जिल्हा हीच आपली आजन्म कर्मभूमी करायचे त्यांनी ठरवले. पण म्हणतात ना... दैव योजी दुसरे! दुर्दैवानं त्याचवेळी ठाण्याचे संघाचे अध्वर्यू श्री. रामभाऊ म्हाळगी य

शिवसूर्यहृदय

||शिवसूर्यहृदय|| जधीं दाटतो पूर्णतः अंधकार| दिसे मार्ग ना लक्ष सर्वस्वी दूर|| अश्या संकटी कोणी ना घाबरावे| शिवाजी चरित्रास भावें स्मरावे||१|| असंख्यात गेले विरोधात लोक| तरी घालणे ना यमाला ही भिक|| जरी सागरा एवढे म्लेंछ आले| शिवाजी आणि मावळे नाही भ्याले||२|| करी घेऊ ते कार्य सिद्धिस नेऊ| असा सह्य निर्धार चितांत ठेऊ|| शिवाजी आपत्ती पुढे नाही झुकले| जगी हिंदवी राज्य निर्माण केले||३|| सुखाला आधी लाथ मारा धृतीने| उठा मार्ग चाला कड़या निश्चयाने|| जगी गांडूळा सारखे ना जगावे| उरी बाजीतानाजीला संस्मरावे||४|| नका भिक घालू कधी संकटाला| उठा ठोकरा येई ते ज्या क्षणाला|| मनाला नसावा कधी भीती स्पर्श| जिजाऊसुतांचा जगया आदर्श||५|| महामंत्र आहे न्हवे शब्द साधा| जयांच्या स्मृतीने जळे म्लेंछ बाधा|| नुरे देश अवघा जयांचे अभावी| शिवाजी जपु राष्ट्र मंत्र प्रभावी||६|| जिथे मोगरा तेथे राहे सुवास| जिथे कृष्ण तेथे जयश्री निवास|| शिवाजी जपु मंत्र आर्त मतिनी| शिवाजी तिथे माय तुळजाभवानी||७|| चहु बाजूने वादळे घेरतील| कुणीही सवे सोबतीला नसेल|| दिशा वाट सर्वस्वी ही हारविता| शिवाजी

दौडीचे श्लोक

⛳श्री तुळजाभवानी प्रसन्न⛳ श्री दुर्गामाता दौडीमध्ये तोंडपाठ म्हणावयाचे काही श्लोक. रोज एकदा तरी मोठ्याने म्हटल्यास पाठ होऊन जातील. अंधारातही सर्व पाहु शकती, ऐसे आम्हा नेत्र दे। अग्नीलाही बसेल स्पर्श करिता, चटका असें चित्त दे।। निद्रा भूक तहान सर्व ईशणा, गिळण्या मनीं शक्ति दे। अंबे दे शिवसूर्यसदृश उरीं, भक्ती कृती धैर्य दे।। अंबे दे शिवपुत्रसदृश उरीं, भक्ती कृती धैर्य दे।। _____________________________________ नभासारिखें चित्त देई विशाल। तसें जान्हवी सारिखे शुद्ध शील।। रवी सारिखी बुद्धि तेजस्वी देई। प्रभु मागणे अन्य तें काहीं नाही।। आई मागणे अन्य ते काहीं नाही।। _____________________________________ व्याकूळ चित्त अमुचे तव दर्शनार्थ। आशिष देई जननी बनण्या कृतार्थ।। झुंझार राष्ट्र करण्या अवघ्या जगांत। जगदंब वास कर तूं आमच्या उरांत।। _____________________________________ आतूर धावत आलो, तव दर्शनाला। शिवबा समान मतिं हॄद द्युति दे आम्हाला।। शिवतेज ठासून भरू, जनशोणितांत। करू हिन्दुराष्ट्र बलदंड, उभ्या जगांत।। _____________________________________ आम्हां ऐंक

धेय आपुले साध्य करु

नगर ग्राम अन वस्ती वस्ती शिवशक्तिचे केन्द्र करु परिश्रमाने पराक्रमाने धेय आपुले साध्य करु ॥धृ॥ इतिहासाचा बोध घेउनि निज स्वार्थाला दूर करु हिन्दुत्वाचा विसर न व्हावा अशी साधना नित्य करु भगवा झेंडा गुरु आपुला रोज तयाला नमन करु ॥१॥ भेद भावना कुणी निर्मिली चर्चा आता व्यर्थ असे संघ भावना मनात रुजता समरसता ही सहज दिसे भारत भू चे सुपुत्र सारे मातेचा जयकार करु ॥२॥ राष्ट्र संकटी चहु दिशान्नी भय घंटा ही वाजत असे धर्म संस्कृति राष्ट्र ग्रासणे कुटिल अरीचा डाव असे दिशा दिशान्नी सरसाओनि स्वत्व रक्षणि सार्थ करु ॥३॥ नाद घालति गिरि कन्दरी बन्धू अपुले हेच दुखि अर्पुन अपुले तन मन धन हे जीवन त्यांचे करु सुखि जन्म अपुला राष्ट्रा साठी शंभू पंथे गमन करु ॥४॥